Monday, 27 March 2017

भावतरंग- मनाची द्वंद्वात्मक अपत्ये

़़़़़ मनात नको नको ते विचार विचार येतात.भूतकाळातील दुःख,यातना, वेदना देणाऱ्या घटना वा भविष्यात येऊ घातलेल्या मनःकल्पित दुःखदायक संत्रस्त करणाऱ्या अघटित घटनां भोवती मन रुंजी घालतं.त्यामुळे बेचैनी वाढते. अशांतता वाढीस लागते.जे झालं नाही ,कदाचित होणारही नाही,ते झाल्याचा भ्रम होतो तो वाढत जातो.झोपेचं खोबरं होतं. मानसिक तनाव वाढतच जातो.वास्तविक जे पांखरू हातात नाही त्याचा विचार व्यर्थ कळतं पण वळत नाही .हाती जे आहे,या क्षणी जे घडतंय ते अनुभवणं,शब्द, स्पर्श, रूप,रस,गंध यांचा आस्वाद घेणं म्हणजेच वर्तमानात जगणे मनाचा स्वभाव नसतो.अनाकलनीय असतं त्याचं हलणं डुलणं. शरीरात कोणत्या ठिकाणी मन असतं तेही जाणवत नाही. त्याला त्याला आकार नसतो.विकारोत्पत्ती त्याच्या मुळेच होत असते.काम, क्रोध, मद,मोह,लोभ,मत्सर,असुया,द्वेष,ईर्ष्या,महत्वाकांक्षा.जय पराजय,लाभहानी, सुख दुःख,मनाची द्वंद्वात्मक अपत्ये.सारीच तशी उपयुक्त तशीच त्याज्यही मनातलं कुणाला सांगू नये म्हणतात ते त्यामुळेच.कारण मनाचं रूप खोड- खोडसाळ असतं.त्याच्या खोड्या बहुदा विघातकच असतात .शब्द,स्पर्श, रूप, रस, गंध यांची पंचेन्द्रियांद्वारे येणारी अनुभूती हेच खरं सत्य. माणूस शब्दांची फेकाफेक स्वार्थासाठी करतो.लाभासाठी करतो. कधी तो शब्द देतो,तर कधी शब्द फिरवतो .हेतू मात्र स्वार्थच असतो. प्रेमळ शब्द ओठातून बाहेर पडतात पण मनात मात्र आगीचा डोंब उसळलेला असतो.अप्रिय व्यक्ती समोर आल्यावर तिच्या स्वागताचं नाटक करावं लागतं .ही लपवालपवी त्रासदायक असते. परंतु व्यवहारी जगात त्यालाच चातुर्य म्हटलं जातं. गोडगोड बोलून बिनदिक्कत फसवणूक क- रता येते,धोका देता येतो,दगाफटका करता येतो मग अशावेळी आतून माणूस होरपळला जातो.आतएक तर बाहेर दुसरंच अशी कसरत करावी लागल्यामुळे मानसिक ताण मात्र वाढतच जातो......

No comments:

Post a Comment