Sunday, 5 August 2018
Sunday, 10 June 2018
भावतरंग--:मनाचं नमन करणे हाच पुरुषार्थ
मनाची गुंतागुंत सहजा सहजी उकलत नाही. कधी ते आपल्या चुका प्रांजळपणे कबूल करतं तर कधी ह्या चुका नाहीतच म्हणून मल्लिनाथी करत बसतं. त्याचं अंतिम असं ठोस अभिमत नसतं. माणसाला सारखं दोन टोकात
झुलवत ठेवण्यात त्याला आनंद वाटतो. शेवटी स्वत:माझी हुकुमत शरीरावर चालते हेच त्याला हवं असतं. हुकूमतीचं
वेड हेच त्याचं ईप्सित असतं.
सभोवतालच्या लोकांना वाटतं हे असले वेडेचार का होताहेत. माणूस तर साधा सरळ पण त्याच्याकडून अशा उलट
सुलट कृती का व्हाव्यात?
मन बलवान असतं. इंद्रियांना आपल्या इच्छेनुसार नाचवण्यात त्याला और आनंद मिळतो. मन जिंकणं महा कठिण.
मनावर विजय म्हणजे स्वत:वर विजय. मन एकदा का हातात आलं की आनंदाचा अविरत स्त्रोत हाती यायला वेळ
लागत नाही. मनाचं चांचल्य हीच मनाची खासियत. चांचल्य हाच त्याचा स्वभाव.
जो मनाच्या आहारी जातो तोही असाच चांचल्याचा गुलाम बनतो. तो स्वतः चा राहातच नाही. स्वत्व त्याला नसतंच.
त्यामुळे त्याच्या अस्तित्वालाही अर्थ नसतो. मन हा माणसाचा विशेष. मन जिंकणं मनाचं अमन, नमन करणं हाच
पुरुषार्थ.
झुलवत ठेवण्यात त्याला आनंद वाटतो. शेवटी स्वत:माझी हुकुमत शरीरावर चालते हेच त्याला हवं असतं. हुकूमतीचं
वेड हेच त्याचं ईप्सित असतं.
सभोवतालच्या लोकांना वाटतं हे असले वेडेचार का होताहेत. माणूस तर साधा सरळ पण त्याच्याकडून अशा उलट
सुलट कृती का व्हाव्यात?
मन बलवान असतं. इंद्रियांना आपल्या इच्छेनुसार नाचवण्यात त्याला और आनंद मिळतो. मन जिंकणं महा कठिण.
मनावर विजय म्हणजे स्वत:वर विजय. मन एकदा का हातात आलं की आनंदाचा अविरत स्त्रोत हाती यायला वेळ
लागत नाही. मनाचं चांचल्य हीच मनाची खासियत. चांचल्य हाच त्याचा स्वभाव.
जो मनाच्या आहारी जातो तोही असाच चांचल्याचा गुलाम बनतो. तो स्वतः चा राहातच नाही. स्वत्व त्याला नसतंच.
त्यामुळे त्याच्या अस्तित्वालाही अर्थ नसतो. मन हा माणसाचा विशेष. मन जिंकणं मनाचं अमन, नमन करणं हाच
पुरुषार्थ.
Saturday, 9 June 2018
भखवतरंग---लहरी मन वारंवार फसवतं.
लहरी मन वारंवार फसवतं. फसवणूक झाल्यानंतर लक्षात येतं की फसवणूक झाली. अगदी नकळत. प्रत्येक क्षणी अव्याहतपणे जागृत रहायला हवं. जागृतीत फसवणूक होण्याची शक्यता फारच कमी असते.
उठणं बसणं, खाणं पिणं, हिंडणं फिरणं, राहणं, हसणं हसवणं, सहेतुक वा अहेतुक, या सर्व
क्रिया मनाचं चांचल्य वाढवतात. निर्हेतुक असं काहीही घडत नसतं.
माणूस मात्र म्हणतो मला कळत नाही की हे असं कसं झालं?का झालं? ही शुद्ध फसवणूक असते. हेतु अप्रगट
असतो. त्याचं आकलन झालेलं नसतं. कारण मनाचा ढिलेपणा वा कृतीची यांत्रिकता.
उठणं बसणं, खाणं पिणं, हिंडणं फिरणं, राहणं, हसणं हसवणं, सहेतुक वा अहेतुक, या सर्व
क्रिया मनाचं चांचल्य वाढवतात. निर्हेतुक असं काहीही घडत नसतं.
माणूस मात्र म्हणतो मला कळत नाही की हे असं कसं झालं?का झालं? ही शुद्ध फसवणूक असते. हेतु अप्रगट
असतो. त्याचं आकलन झालेलं नसतं. कारण मनाचा ढिलेपणा वा कृतीची यांत्रिकता.
Tuesday, 5 June 2018
भावतरंग---मन म्हणजे आठवणींचा पेटारा
मनातलं सारं सारं माणूस चार चौघात सांगत नाही. अनेक गोष्टी हृदयात असतात. चारचौघात बसल्यावर होणार्या गप्पा वरवरच्या असतात. बराचसा वेळ इतरांच्या वागणुकीची चिरफाड करण्यात जातो.
माणुस आहे तसा कधीच व्यक्त होत नाही. त्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू त्यालाच माहीत असतात. त्यामुळे मी ना त्याला
पूर्ण ओळखतो अशी विधाने खरी नसतात.
कुणीही कुणाला पूर्ण ओळखणं शक्य नसतं. क्षणोक्षणी बदलणारी परिस्थिती व वागणूक एक सारखी नसते. शिवाय वेगवेगळ्या अनुभवातून मिळणाऱ्या ज्ञानामुळे वागणुकीतही एक वाक्यता वाएकरसता नसते.
मन म्हणजे आठवणींचा पेटारा. या आठवणी बहुदा कटूच असतात. क्वचित सुखावह आठवणी मनाला हुरूप देतात.
माणुस आहे तसा कधीच व्यक्त होत नाही. त्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू त्यालाच माहीत असतात. त्यामुळे मी ना त्याला
पूर्ण ओळखतो अशी विधाने खरी नसतात.
कुणीही कुणाला पूर्ण ओळखणं शक्य नसतं. क्षणोक्षणी बदलणारी परिस्थिती व वागणूक एक सारखी नसते. शिवाय वेगवेगळ्या अनुभवातून मिळणाऱ्या ज्ञानामुळे वागणुकीतही एक वाक्यता वाएकरसता नसते.
मन म्हणजे आठवणींचा पेटारा. या आठवणी बहुदा कटूच असतात. क्वचित सुखावह आठवणी मनाला हुरूप देतात.
Monday, 4 June 2018
मनस्तरंग व हृदयोर्मी माणसाला बेचैन करतात. अंतरंगातील भाव जेव्हा मनात प्रवेश करतात तेव्हा शरीरावर कृतीशील होतात. त्यांना हवीतशी कृती झाल्यावरच स्तब्धता अनुभवास येते. अन्यथा औदासिन्य वा तडफड माणसाला बेचैन करते. त्यातूनच अनेक भावभावना डोकावू लागतात. विचारांची एकच लाट उभी रहाते. सारंसारं घुसळून काढते ती. ही घुसळण
म्हणजेच भावोर्मींचा संघर्ष. भावभावनांचं युद्ध. त्यात प्रबल भावना बाजी मारते. अन्य सर्व भावना खदबदत रहातात.
निसर्गातही काळे कुट्ट ढग आकाशात गर्दी करतात. विजांचा कडकडाट होतो,ढगांचा गडगडाट होतो. वारा सून साय सूं
साय करीत असतो. टपोरे थेंब झरझर वेगाने पडतात. त्यानंतर कुठे सारं निवांत, शांत, स्तब्धता, नीरवता.
म्हणजेच भावोर्मींचा संघर्ष. भावभावनांचं युद्ध. त्यात प्रबल भावना बाजी मारते. अन्य सर्व भावना खदबदत रहातात.
निसर्गातही काळे कुट्ट ढग आकाशात गर्दी करतात. विजांचा कडकडाट होतो,ढगांचा गडगडाट होतो. वारा सून साय सूं
साय करीत असतो. टपोरे थेंब झरझर वेगाने पडतात. त्यानंतर कुठे सारं निवांत, शांत, स्तब्धता, नीरवता.
Saturday, 2 June 2018
भावतरंग--मनातला उद्वेग शांत करणारं लेणं.
थंड वारा, डुलणारं लुसलुशीत हिरवं ,गवत, डोलणारी झाडं, वेली,उमललेली फुले, निळं आकाश, थोडा वेळ दिसणारं इंद्र धनुष्य, पावसाच्या रिमझिम धारा थांबल्यावर स्वच्छ झालेले डांबरी रस्ते, आकाशातले मेघ, तारांवर बसलेली चिमणी पां-
खरं,निसर्गातलं हे सौंदर्य केवळ दिलखेचकच नव्हे तर आल्हाददायक असतं. डोळे ते सारं सारं टिपतात निरागसपणे. अं-
तर मनाची प्रतिक्रिया आनंददायी असते.
दूरवर दिसणारे निळे डोंगर, पहाटेचा वा संध्याकाळचा उगवता व मावळता सूर्य ,नदी व ओढ्यातून वाहणारे खळखळ आवाज करणारे पाणी, कोकिळेचं कूजन, चिमण्यांची चिवचिव, बासरीच्या मधुर ताना, गायक वा गायिकेच्या कंठातून
बाहेर पडणारे सुमधुर स्वर ,देवासमोर पेटवलेल्या उदबत्तीचा मंद धुंद करणारा सुगंध, कापराची ज्योत सारं सारं मन
मन मुग्ध करणारं मनातला उद्वेग शांत करणारं लेणं.
खरं,निसर्गातलं हे सौंदर्य केवळ दिलखेचकच नव्हे तर आल्हाददायक असतं. डोळे ते सारं सारं टिपतात निरागसपणे. अं-
तर मनाची प्रतिक्रिया आनंददायी असते.
दूरवर दिसणारे निळे डोंगर, पहाटेचा वा संध्याकाळचा उगवता व मावळता सूर्य ,नदी व ओढ्यातून वाहणारे खळखळ आवाज करणारे पाणी, कोकिळेचं कूजन, चिमण्यांची चिवचिव, बासरीच्या मधुर ताना, गायक वा गायिकेच्या कंठातून
बाहेर पडणारे सुमधुर स्वर ,देवासमोर पेटवलेल्या उदबत्तीचा मंद धुंद करणारा सुगंध, कापराची ज्योत सारं सारं मन
मन मुग्ध करणारं मनातला उद्वेग शांत करणारं लेणं.
Thursday, 31 May 2018
मनात आठवणींचा साठा असतो. आंबट गोड आठवणी सारख्या साठवल्या जातात.स्मृती चित्रांची फिल्म सारखी फिरत असते. क्षणोक्षणी मनातील भावतरंग बदलत असतात. गत कालातील भयानक घटना मनासमोर येत राहतात.
घटना घडून गेलेल्या असतात. त्या घडता क्षणी ज्या अनुभूती अनुभवास आल्या त्यातील मधुर आठवणी मन वगळून
देतं व उद्वेगजनक संत्रस्त करणारे क्षण मात्र सारखे घोळत असतं. हा घोळ वाढतच जातो.
घटना घडून गेलेल्या असतात. त्या घडता क्षणी ज्या अनुभूती अनुभवास आल्या त्यातील मधुर आठवणी मन वगळून
देतं व उद्वेगजनक संत्रस्त करणारे क्षण मात्र सारखे घोळत असतं. हा घोळ वाढतच जातो.
Subscribe to:
Posts (Atom)