़़़ मनःशांतीसाठी अनेक बाह्य उपाय केले जातात.त्यामुळे तात्पुरती जुजबी शांती लाभल्याचा भासही होतो पंण प्रत्यक्षात मात्र तसं नसतं.जुजबी पापुद्रा केव्हा फाटतो ते कळतही नाही व मन सैरभैर धावतं.मनातील भाव तरंग हेलकावे घेतात.त्यांना नकारात्मक स्वरूपच आवडते की काय कुणास ठावूक त्यामुळे न्यूनगंड तयार व्हायला लागतो व एकदा का त्यानं ताबा घेतला की विमनस्कता,नैराश्य,आत्मग्लानी वाढू लागते.विचार चक्र गतिमान होतं.समु- द्रात एकदम लाटा उसळाव्यात तसे विचार उसळू लागतात.त्यांना आगा नसतो की पिच्छा नसतो.त्यांचं उग्र रूप क्षणोक्षणी वाढतच जातं त्यातून एकसुरीपणा, एककल्लीपणा वा एकलकोंडेपण जन्माला येते. जीवनातली उभारी संपते.आपल्या हातून काहीच घडणार नाही. अशी भावना वाढीला लागते.अपयशी हमखास होऊ असे वाटू लागते.एकदा का ही वावटळ उठली की ती थांबायचं नावच घेत नाही.विचारांच्या भाऊगर्दीमुळे निश्चय डळमळतो.बुद्धीमांद्य येतं.डोकं काम करेनासं होतं.माणूस दैववादी बनतो आपल्या नशिबाला दोष देतो. कुठलंच लक्ष्य समोर नसतं.दिशाहीन वाटचाल सुरु होते.स्व- प्नरंजन व स्वप्न भंजनाची शर्यत सुरु होते.स्वतःवरचा विश्वास उडतो.माणूस परिस्थितीला शरण जातो.पराक्रम व पुरुषार्थावरील त्याची श्रद्धा उडते व तो कापुरुष बनतो.सर्वत्र छिःथू होते. त्याचं त्याला सोयरसुतक नसतं.तो सारखं इतरांना कोसत असतो.़़़़़
Thursday, 29 March 2018
Wednesday, 28 March 2018
आवडलेला विचार
तुमची मुले तुमची नाहीत.जीवनाच्या स्वतःच्याच उत्कट इच्छेची ती मुले आणि मुली आहेत.ती तुमच्यातून येतात पण तुमच्या पासून नाही आणि जरी ती तुमच्या बरोबर असली,
तरी तुमची नसतात.तुम्ही त्यांना तुमचे प्रेम देऊ शकता,पण विचार नाही.कारण त्यांचे स्वतःचे
विचार असतात.
खलील जिब्रान
Subscribe to:
Posts (Atom)