Friday, 31 March 2017
भावतरंग- मनाची कर्तूत
Wednesday, 29 March 2017
भावतरंग मन म्हणजे इंद्रियांचा राजा
Monday, 27 March 2017
भावतरंग- मनाची द्वंद्वात्मक अपत्ये
Sunday, 26 March 2017
भावतरंग-साऱ्या भावना स्वार्थाशी निगडित असतात
Saturday, 25 March 2017
भावतरंग-आतली खदबद
Friday, 24 March 2017
भाव तरंग--पण ऐकतंय कोण?
Wednesday, 22 March 2017
भाव तरंग ---मनाच्या घिरट्या
.. भाव तरंग---मनाच्या व्यर्थ घिरट्या मनात नको नको ते विचार येतात.विचारांची आवर्तन वाढतंच जातात नकारात्मक तरंगांची संख्या वाढतच जाते.त्यामुळे मन खंतावतं.बेचैनी वाढतच जाते.काळजी,विवंचना, चिंता,भिववतात.असुरक्षिततेची भावना वाढतच जाते. आजची अवस्था आहे तशी राहील की नाही या विषयी भवती न भवती सुरु होते.स्थितीशीलता हा स्वभाव.आरोग्य,आर्थिकस्थिती, कौटुंबिक संबंध सामाजिक प्रतिष्ठा,राजकीय परिस्थिती या विषयी तऱ्हेचे विचार येतात. थोडीशी प्रकृती बिघडली,नैसर्गिकपरिस्थितीत परिवर्तन झाल्यामुळे शारीरिक त्रास वाढला की विचार चक्र भिरभिरु लागतं. ज्या गोष्टीवर आपलं नियंत्रण नाही त्या गोष्टीचा विचार करणं व्यर्थ असतं.पण मन मात्र त्या गोष्टी भोवतीच गिरक्या घेतअसतं. तशी प्रकृती-आरोग्य काहीसं हातात असतं. खानपान, आहारविहार, व्यायाम,श्रम, विश्राम या सर्वात संतुलन असलं की प्राकृतिक स्वास्थ्य लाभ- तं.पण संतुलन बिघडलं की स्वास्थ्य बिघडतं. शरीर स्वास्थ्याचा मनः स्वास्थ्याशी घनिष्ठ संबंध असतो.मन जरस्थिर असेल तर शरीर ही स्वस्थ राहातं. " शरीरमाद्यम् खलु धर्म साधनम् " शब्द ,स्पर्श,रूप,रस,गंध यांचा आस्वाद शरीराद्वारेच घेता येतो.त्या साठी सर्व इंद्रिये कार्यक्षम असायला हवीत. ऐंद्रिक सुख ही क्षणिकच असतं हेही सदैव ध्यानात ठेवायला हव़...ं .
भाव तरंग-मन म्हणजेच मनुष्य
भावतरंग-नवीन परिस्थिती
भावतरंग-नवीन परिस्थिती माणसाचं मन नवीन परिस्थितीशी त्वरित जुळवून घेत नाही.त्याला आपल्या रोजच्या दिन क्रमातला बदल सहज स्वीकारता येत नाही. खेड्यात आयुष्याचा मोठा कालखंड घालवल्यानंतर शहरातलं जीवन त्याला सुसह्य होत नाही. बऱ्याचशा ज्येष्ठ नागरिकांच्या बोलण्यात खेडं बरं होतं .तिथं मन लागायचं इथं मन लागत नाही.पण नाइलाज म्हणून राहावं लागतं. सर्व सुविधा असूनही ही अतृप्ती मनाला डाचत असते त्याचं एकमेव कारण म्हणजे इथल्या परिसराशी जुळवून घेता येत नाही हे होय. शेळ्या,मेंढ्या,शेती,शेणगोठा सारं सारं आठवत राहतं व मन सैरभैर होतं. नव्या माणसांशी घसट व्हायला वेळ लागतो
Sunday, 19 March 2017
भावतरंग--
अन्तर्नाद --- शहरातील एक पहाट
Saturday, 18 March 2017
भाव तरंग-मनाच्या अनाकलनीय चेष्टा
Thursday, 16 March 2017
अंतर्नाद-स्वभाव स्वतःलाच कळतो-
स्वभाव स्वतःलाच कळतो.तो कप्पा इतरांना अद्न्यात असतो.अन्तर्मनातली खदबद स्वतःलाच जाणवते.इतरांना ती दिसत नसते. अन्तर्मनातले भाव लपवण्याचं कौशल्य फक्त मानव प्राण्यात असतं.आपले भाव सर्वच्या सर्व जसेच्या तसे जर माणूस प्रकट करील तर त्याचं स्वार्थी रूप जगाला दिसून येईल व त्याची कवडी किंमत होईल. द्वेष,ईर्ष्या,क्रोध,लोभ सारं सारं माणसाला लपवता येतं.तो जसा असतो तसा क्वचितच दृष्टीगत होतो.त्याचं बाह्य रूप तो अधिकाधिक आकर्षक व प्रभावी ठेवण्याचा प्रयत्न करतो.त्याचं बोलणं,चालणं,उठणं,बसणं कृत्रिम असतं.मनात असतं ते तो बोलतोच असं नाही.आपलं खरं स्वरूप तो लपवित असतो.वैभव, संपत्ती,समृद्धी,घरदार,बंगला,गाडी मिळवण्यासाठी,वैभव प्रतिष्ठा प्राप्ती साठी त्याची धडपड असते.त्यासाठी नको तिथं समझोता असतो.नकोते मार्ग तो अवलंबतो.परंतू अन्तर्मन तो एकटा असतो तेव्हाआतून टोचणी देत.गाडी, बंगला वैभव कसं मिळालं हे जर तो खरं खरं सांगू लागला तर त्याची नाचक्कीच होईल सारं काही वाम मार्गाने मिळावावं लागलं याची त्याला जाणीव होते. वैभव प्रतिष्ठा मिळवूनही तो संतुष्ट नसतो.मन आतून धक्के देत असतं त्याची भर्त्सना करीत असतं.ती टोचणी भयंकर असते ती टोचणी कमी व्हावी म्हणून तो व्यसनाधीन होतो.त्याचं स्वतःचं क्रौर्य,चौर्य जगा पासून लपवता लपवता तो दुहेरी जीवन जगू लागतो.शेवटी आप्तेष्ट,सगे संबंधी,मित्र परीवार साऱ्यां-पासून तो दुरावतो.