Wednesday, 22 March 2017

भावतरंग-नवीन परिस्थिती

भावतरंग-नवीन परिस्थिती माणसाचं मन नवीन परिस्थितीशी त्वरित जुळवून घेत नाही.त्याला आपल्या रोजच्या दिन क्रमातला बदल सहज स्वीकारता येत नाही. खेड्यात आयुष्याचा मोठा कालखंड घालवल्यानंतर शहरातलं जीवन त्याला सुसह्य होत नाही. बऱ्याचशा ज्येष्ठ नागरिकांच्या बोलण्यात खेडं बरं होतं .तिथं मन लागायचं इथं मन लागत नाही.पण नाइलाज म्हणून राहावं लागतं. सर्व सुविधा असूनही ही अतृप्ती मनाला डाचत असते त्याचं एकमेव कारण म्हणजे इथल्या परिसराशी जुळवून घेता येत नाही हे होय. शेळ्या,मेंढ्या,शेती,शेणगोठा सारं सारं आठवत राहतं व मन सैरभैर होतं. नव्या माणसांशी घसट व्हायला वेळ लागतो

No comments:

Post a Comment