मनस्तरंग व हृदयोर्मी माणसाला बेचैन करतात. अंतरंगातील भाव जेव्हा मनात प्रवेश करतात तेव्हा शरीरावर कृतीशील होतात. त्यांना हवीतशी कृती झाल्यावरच स्तब्धता अनुभवास येते. अन्यथा औदासिन्य वा तडफड माणसाला बेचैन करते. त्यातूनच अनेक भावभावना डोकावू लागतात. विचारांची एकच लाट उभी रहाते. सारंसारं घुसळून काढते ती. ही घुसळण
म्हणजेच भावोर्मींचा संघर्ष. भावभावनांचं युद्ध. त्यात प्रबल भावना बाजी मारते. अन्य सर्व भावना खदबदत रहातात.
निसर्गातही काळे कुट्ट ढग आकाशात गर्दी करतात. विजांचा कडकडाट होतो,ढगांचा गडगडाट होतो. वारा सून साय सूं
साय करीत असतो. टपोरे थेंब झरझर वेगाने पडतात. त्यानंतर कुठे सारं निवांत, शांत, स्तब्धता, नीरवता.
म्हणजेच भावोर्मींचा संघर्ष. भावभावनांचं युद्ध. त्यात प्रबल भावना बाजी मारते. अन्य सर्व भावना खदबदत रहातात.
निसर्गातही काळे कुट्ट ढग आकाशात गर्दी करतात. विजांचा कडकडाट होतो,ढगांचा गडगडाट होतो. वारा सून साय सूं
साय करीत असतो. टपोरे थेंब झरझर वेगाने पडतात. त्यानंतर कुठे सारं निवांत, शांत, स्तब्धता, नीरवता.
No comments:
Post a Comment