लहरी मन वारंवार फसवतं. फसवणूक झाल्यानंतर लक्षात येतं की फसवणूक झाली. अगदी नकळत. प्रत्येक क्षणी अव्याहतपणे जागृत रहायला हवं. जागृतीत फसवणूक होण्याची शक्यता फारच कमी असते.
उठणं बसणं, खाणं पिणं, हिंडणं फिरणं, राहणं, हसणं हसवणं, सहेतुक वा अहेतुक, या सर्व
क्रिया मनाचं चांचल्य वाढवतात. निर्हेतुक असं काहीही घडत नसतं.
माणूस मात्र म्हणतो मला कळत नाही की हे असं कसं झालं?का झालं? ही शुद्ध फसवणूक असते. हेतु अप्रगट
असतो. त्याचं आकलन झालेलं नसतं. कारण मनाचा ढिलेपणा वा कृतीची यांत्रिकता.
उठणं बसणं, खाणं पिणं, हिंडणं फिरणं, राहणं, हसणं हसवणं, सहेतुक वा अहेतुक, या सर्व
क्रिया मनाचं चांचल्य वाढवतात. निर्हेतुक असं काहीही घडत नसतं.
माणूस मात्र म्हणतो मला कळत नाही की हे असं कसं झालं?का झालं? ही शुद्ध फसवणूक असते. हेतु अप्रगट
असतो. त्याचं आकलन झालेलं नसतं. कारण मनाचा ढिलेपणा वा कृतीची यांत्रिकता.
No comments:
Post a Comment