रिमझिम पडणारा पाऊस आनंददायी असतो .अशा पावसात भिजण्यात आगळीवेगळी गोडी असते. शरीर पुलकित होतं.
रोम रोम खुलतं फुलतं. अंग अंग शहारतं .मनातली मरगळ संपते.नवनव्या ऊर्मी उत्तेजित करतात. आसमंतातील पशुपक्षी
घरेदारे, झाडे झुडपे सुस्नात होतात. सर्वत्र तालबद्ध स्वरनाद घुमतो . हे स्वर्गीय संगीत म्हणजेच सामगान. माती दगडातील अणु रेणु झंकृत होतो. मैदानातून नादवाही प्रवाह वेडी वाकडी वळणे घेत गतीशील होतात.नव चैतन्याची अनुभुती जड-
जी़वांना ही प्राकृतिक स्थिती अविस्मरणीय असते. प्रकृतीचं हे लेणं लावण्यमय असतं.
रोम रोम खुलतं फुलतं. अंग अंग शहारतं .मनातली मरगळ संपते.नवनव्या ऊर्मी उत्तेजित करतात. आसमंतातील पशुपक्षी
घरेदारे, झाडे झुडपे सुस्नात होतात. सर्वत्र तालबद्ध स्वरनाद घुमतो . हे स्वर्गीय संगीत म्हणजेच सामगान. माती दगडातील अणु रेणु झंकृत होतो. मैदानातून नादवाही प्रवाह वेडी वाकडी वळणे घेत गतीशील होतात.नव चैतन्याची अनुभुती जड-
जी़वांना ही प्राकृतिक स्थिती अविस्मरणीय असते. प्रकृतीचं हे लेणं लावण्यमय असतं.
No comments:
Post a Comment