आत्मनिरीक्षण म्हणजे स्वतःच स्वतःच्या अंतरंगाचं अलिप्ततेनं निरीक्षण करणं होय.
अंतरंगाचे रंग स्वतःलाच कळतात.आतल्या ऊर्मी स्वतःलाच जाणवतात.बहिर्वर्तनात वेगळं दिसू शकतं.निरीक्षणातून जे जाणवतं ते सत्य असतं. त्यापासून पलायन करता येत नाही.
आसक्ती वाढतच जाते.तिला अंत नाही.आसक्तीतून अपेक्षा,अभिलाषा,आकांक्षा,
मोह इत्यादींचा जन्म होतो.
माणूस मात्र आसक्त नसल्याचा आव आणतो .तो खोटा असतो.
अंतर्मनाचा शोध ज्याचा त्यानेच घ्यायचा असतो.परंतु माणूस ते टाळतो.त्यातून
स्वतःला अभिप्रेत नसलेलं स्वतःचं रूप डोळ्यासमोर येण्याचा येण्याचा संभव असतो.तिकडे
लक्ष जाऊ नये म्हणून इतर गोष्टीत स्वतःला गुंतवून घ्यावे लागते.
कुणी वाचनात मग्न तर कुणी लेखनात,कुणी मनोरंजनात तर कुणी व्यसनात,
कुणी नाच गाण्यात तर कुणी नाटक तमाशात,स्वतःला विसरायची हाव.
ज्याच्या त्याच्या मर्जीप्रमाणे ज्याने त्याने स्वतः ठरवलेल्या मार्गाने वाटचाल होते.
कुणी दारु पिऊन स्वतःची स्वतःला होणारी बोच विसरू पाहातो तर कुणी वेश्येच्या पायी वा
तिच्या मिठीत लोळण घेतो.कुणी देव भक्तीत दंग होतो तर कुणी खेळ, क्रीडेत रममाण होतो.
खरं स्वरूप आवडेनासं होतं.लोकांच्या नजरेत चांगलं दिसावं म्हणून प्रतिष्ठित
असल्याचं सोंग घेणं हेच त्याच्या हातात असतं
एकुण स्वत्व दाहक असतं.
Wednesday, 10 May 2017
भावतरंग- स्वत्व दाहक असतं
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment