Sunday, 9 April 2017

भावतरंग-अन्तर्मनातील गुंतागुंत

भावतरंग-अन्तर्मनातील गुंतागुंत--- अन्तर्मनातील गुंतागुंत सहजा सहजी लक्षात येत नाही.कधी व कसा अनपेक्षित धक्का ते देते व गाडी मुळ रुळावरून धावू लागते ते कळेनासं होतं.आपण ठरवतो एक.ठाम निश्चय करून काही काळ त्या प्रमाणे वर्तणुक होते.इंद्रियांवर नियंत्रणअसतं.जागृतते मुळे ती विचलित होत नाहीत पण बेसा- वध क्षणीअसं काही घडून येतं की केलेल्या निश्चयाच्या विपरित कृती घडून जाते. व मग पश्चात्तापा शिवाय पर्याय नसतो.ही ससेहोलपट अचानक व अनपेक्षितपणे होत असते.त्याचा ताण असह्य होतो व विपरित कृती घडून येते.मग स्वतःचा स्वतःवरचा ताबा जातो.राग येतो.स्वतःच्या दुबळ्या निश्चया- ची जाणीव होते व मन गदगदतं.हताश व निराश. होतं. अनेकदा असं घडतं.आश्चर्य वाटतं.अन्तर्मनाची अगाध शक्ती अना- कलनीय असते.तिथं शांतता असल्याशिवाय जीवनात शांतीचा अनुभव येत नाही. सारी भौतिक सुख पायाशी लोळण घेत असतानाही अन्तर्मन व्य_ थित असतं.दुःखी असतं.क्रोधाविष्ट असतं.कधी कधी तर ते माणसाला आयु-ष्यातून उठवून लावतं. एकच क्षण बेसावधपणाचा माणसाला खातेऱ्यात ढक- लतो. एकतर तो ठार वेडा तरी होतो वा आत्महत्या तरी करतो.निराश, हताश होऊन जीवनातलं सौंदर्य गमावतो.स्वतः उध्वस्त होतो व इष्ट,मित्र व स्वकियांना संत्रस्त करतो. अन्तर्मन शुद्धी शिवाय खरी शुद्धी होत नाही.ते निर्मळ झाल्यावरच खऱ्या आनंदाचास्रोत गवसतो.अन्यथा सारीच फसवणुक असते

No comments:

Post a Comment