Sunday, 9 April 2017
भावतरंग-अन्तर्मनातील गुंतागुंत
भावतरंग-अन्तर्मनातील गुंतागुंत---
अन्तर्मनातील गुंतागुंत सहजा सहजी लक्षात येत नाही.कधी व कसा अनपेक्षित धक्का ते देते व गाडी मुळ रुळावरून धावू लागते ते कळेनासं
होतं.आपण ठरवतो एक.ठाम निश्चय करून काही काळ त्या प्रमाणे वर्तणुक
होते.इंद्रियांवर नियंत्रणअसतं.जागृतते मुळे ती विचलित होत नाहीत पण बेसा-
वध क्षणीअसं काही घडून येतं की केलेल्या निश्चयाच्या विपरित कृती घडून
जाते. व मग पश्चात्तापा शिवाय पर्याय नसतो.ही ससेहोलपट अचानक व अनपेक्षितपणे होत असते.त्याचा ताण असह्य होतो व विपरित कृती घडून
येते.मग स्वतःचा स्वतःवरचा ताबा जातो.राग येतो.स्वतःच्या दुबळ्या निश्चया-
ची जाणीव होते व मन गदगदतं.हताश व निराश. होतं.
अनेकदा असं घडतं.आश्चर्य वाटतं.अन्तर्मनाची अगाध शक्ती अना-
कलनीय असते.तिथं शांतता असल्याशिवाय जीवनात शांतीचा अनुभव येत
नाही.
सारी भौतिक सुख पायाशी लोळण घेत असतानाही अन्तर्मन व्य_
थित असतं.दुःखी असतं.क्रोधाविष्ट असतं.कधी कधी तर ते माणसाला आयु-ष्यातून उठवून लावतं. एकच क्षण बेसावधपणाचा माणसाला खातेऱ्यात ढक-
लतो. एकतर तो ठार वेडा तरी होतो वा आत्महत्या तरी करतो.निराश, हताश
होऊन जीवनातलं सौंदर्य गमावतो.स्वतः उध्वस्त होतो व इष्ट,मित्र व स्वकियांना
संत्रस्त करतो.
अन्तर्मन शुद्धी शिवाय खरी शुद्धी होत नाही.ते निर्मळ झाल्यावरच
खऱ्या आनंदाचास्रोत गवसतो.अन्यथा सारीच फसवणुक असते
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment